Sunday, September 28, 2008

आद्य शंकराचार्य - अखेर

शंकराचार्य कामरूपला (आताचे आसाम मधील गुवाहाटी) गेले. तेथे त्यांनी शाक्तपंथाचा भाष्यकार अभिनवगुप्त बरोबर वादविवाद करून त्यामधे जय मिळविला. अभिनवगुप्ताने पराभवाचा राग मनात ठेवून आचार्यांवर काही दुष्ट शक्तींचे प्रयोग केले, त्यायोगे आचार्यांना आत्यंतिक शारीरिक व्याधींचा त्रास होवू लागला. पद्मपादाने त्या दुष्ट शक्तींचा प्रभाव दूर केल्यावर त्यांना बरे वाटू लागले. यानंतर ते हिमालयात गेले, तेथे त्यांनी ज्योतिर्मठाची (जोशी मठ) स्थापना केली, तसेच बद्रीधाम मंदिराची स्थापना केली. तेथून पुढे आचार्य, हिमालयातील ऊंच ठिकाणी असलेल्या केदारनाथ या ठिकाणी गेले.


वयाच्या अवघ्या बत्तिसाव्या (३२) वर्षी या महान आत्म्याने, केदारनाथच्या शिवलिंगामधे एकरूप होऊन ईहलोकाचा निरोप घेतला.

No comments: